विधानसभा स्वबळावर लढवणार, ममता बॅनर्जी यांची घोषणा; काँग्रेससोबत आघाडी नसल्याचे स्पष्ट.

पश्चिम बंगालच्या २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. काँग्रेसशी आघाडी करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करतानाच, तृणमूल काँग्रेस बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सन २०२६मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. काँग्रेसशी आघाडी करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करतानाच, तृणमूल काँग्रेस बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तृणमूल काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘जागो बांगला’मध्ये याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीमध्ये सोमवारी बॅनर्जी यांनी ही भूमिका मांडल्याचे त्यात म्हटले आहे. ‘२०२६मध्ये तृणमूल दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत परतेल. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. आम्ही एकटे लढू आणि एकटेच जिंकू’, असे त्यांनी आमदारांना सांगितले. तृणमूल काँग्रेस सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू झाल्याचेही त्या म्हणाल्या.प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून अधीररंजन चौधरी यांना काढून टाकल्यानंतर आणि तृणमूल काँग्रेसबद्दल सौम्य मानल्या जाणाऱ्या शुभंकर सरकार यांची नियुक्ती झाल्यानंतर, राजकीय वर्तुळात काँग्रेस-तृणमूल काँग्रेस यांच्यात संभाव्य सामंजस्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ‘आघाडीचा प्रश्नच उद्भवत नाही. तृणमूल काँग्रेस एकटे लढेल आणि ऐतिहासिक विजय मिळवेल. काँग्रेसचे बंगालमध्ये कोणतेही अस्तित्व नाही. आम्हाला बंगालमध्ये काँग्रेससोबत कोणत्याही आघाडीची आवश्यकता नाही’, ही भूमिका बॅनर्जी यांनी मांडल्याने आघाडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.‘दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर, अनेक प्रादेशिक पक्षांना हे लक्षात आले आहे की, काँग्रेसकडे दुर्लक्ष करणे चूक होती. २०११मध्ये डाव्या आघाडीचा पराभव करून काँग्रेसनेच तृणमूल काँग्रेसला सत्तेत येण्यास मदत केली होती’, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शुभंकर सरकार म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.