नंदुरबार आदिवासी जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला अपेक्षीत, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व येथील आरोग्याचे स्थानिक मुलभूत प्रश्न जसे सिकलसेल, भुकबळी (कुपोषण), मातामृत्यु, बालमृत्यु हे हद्दपार होतील अशी महत्वाकांक्षा बाळगली जात होती परंतु काही अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे या समस्या जिल्ह्यात जशाच्या तशा आहेत आताचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे याही त्याला अपवाद नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभारामुळे आज जिल्हा रुग्णालाची अवस्था बिकट झाली आहे .अधिकारी व कर्मचारी यांना दबावात ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे, अभ्यंगतांना मोबाईल कॅबीन बाहेर ठेवायला लावणे.

वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मासिक खच्चीकरण करणे. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांना आदेश देणे किंवा रद्द करणे, तदर्थ नुतनीकरण करणे यासाठी, आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या तक्रारी त्याच्या विरोधात प्राप्त झाल्या आहेत. आदिवासी भागात काम करण्यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता लागु करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणाची मागणी केली जाते. कर्मचाऱ्यांचे पुर्ननियुक्ती आदेश जुलै महिणन्यात दिले जातात परंतु ते आदेश देण्यास सहा महिणे विलंब करणे, सी आर ,वेतन पळताळणी, रजा मंजुरी यासाठी आर्थिक व मानसिक त्रास देणे मला कोणाची भीती नाही व मी कोणाला भीत नाहीयाबाबतीत चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करून यांची तात्काळ बदली करावी अशी या मागणी नंदुरबार येथील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तर्फ निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर अध्यक्ष डॉ राजेश वळवी सल्लागार डॉ राजेश वसावे यांच्यासह महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत










