पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी दोन दादांमध्ये शाब्दिक ‘वॉर’ रंगला आहे. मुख्यमंत्र्यांसमोरच महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी दोन दादांमध्ये शाब्दिक ‘वॉर’ रंगला आहे. मुख्यमंत्र्यांसमोरच महायुतीत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच जुंपली होती.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला? याची अजितदादांनी महेशदादांना सगळीच आठवण करून दिली आहे. महेश लांडगे यांनी शिवनेरी जिल्हा करण्याची मागणी केली तर अजितदादा म्हणाले असे काहीही होणार नाही, जे चाललंय ते व्यवस्थित सुरू आहे. यावरुन असे दिसतेय की, महापालिका निवडणुकीआधीच अजित पवार अन् महेश लांडगे यांच्या संघर्ष नाट्याचा जुना अंक नव्याने सुरू झाला आहे.अजित पवार म्हणाले, आता महेशने सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला, मला माहिती नाही. परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे, १९९२ला मी तुमचा खासदार झालो १९९२ ते २०१७ कोणी पिंपरी चिंचवड सुधारवलं? आज २५ वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार है ज्याने केले, त्याला त्याच क्रेडिट देत असतो.तर अजित पवारांनी पुढे ‘कुणीतरी बातम्या उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार. मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका,’ असा दम देखील भरला आहे.तर प्रत्युत्तरादाखल महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. तुम्ही मुख्यमंत्री असताना याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तायाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन सुद्धा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या खाली कुठेतरी लपल्यासारखी होते. मात्र तुमच्यामुळे याची वेगळी ओळख अन्य अस्तित्व निर्माण झालं. ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विभाजन करायचं झालं तर, एका जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं ही माझी विनंती आहे.









