लेकीसह नातवाला साखळदंडाने बांधलं, २ महिने डांबून ठेवलं; जालन्यातील खळबळजनक घटना.

 लेकीने आंतरधर्मीय विवाह केला. पण, कुटुंबाला ते काही मान्य झालं नाही. तीन वर्षांनी मुलगी घरी आली तेव्हा घरच्यांनी तिच्या नवऱ्याला हाकलून लावलं आणि मुलीला साखळदंडाने बांधून ठेवलं.पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी शहरालगतच्या आलापुर भागातून सुटका केली आहे. तिला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मार्फत तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला. यानंतर शहा कुटुंबीय आलापुर येथे परत आपल्या मूळ गावी आले. या विवाह संबंधातून शहनाजला तीन वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगाही आहे.

साधारणतः दोन महिन्यांपूर्वी शहनाजच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला आणि तिचा पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते या ठिकाणी आले असता शहनाज आणि तिचा मुलगा कार्तिक यांना तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले आणि पती सागर याला घरातून हाकलून दिले. यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा आणि आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला हाकलून देण्यात आले.मात्र, यानंतर २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागर याला फोन करून सांगितले की शहनाज आणि तिच्या मुलाला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने घरात डांबून ठेवले असून त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे सागर याने अखेर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन त्याच्या पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना आदेश दिले की, शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांची सुटका करावी. त्यानुसार, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली ते आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरी गेले. मात्र, त्यांना शहनाजच्या आईने कोणताही थारा लागू दिला नाही. यानंतर त्यांनी गोपनीय माहिती मिळवून थेट घरामध्ये घुसून शहनाज व कार्तिक यांना ताब्यात घेतले.यावेळी शहनाजच्या आईने भरपूर विरोध केला प्रसंगी पोलिसांवर चाल ही केली. मात्र, महिला कर्मचारी सीमा देठे व उपनिरीक्षक बी. टी. सहाने यांनी कुटुंबीयांच्या कठोर विरोधाला नजुमानता शहनाज व कार्तिक यांना भोकरदन पोलीस ठाण्यात आणले यावेळी शहनाजचे दोन्ही पाय मोठ्या साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावण्याचे आढळून आले. पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी या कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून ही कुलपे उघडली व शहनाजला मुक्त केले. यानंतर २९ जानेवारी रोजी उपनिरीक्षक बी. टी. सहाने यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभीभोक्ता ए. आर. काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून तिचे पती सागर ढगे यांच्या स्वाधीन केले.या प्रकरणाची भोकरदन पोलिसांना मुळात कल्पना नव्हती. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आदेश दिल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. मात्र, खालिद शहा यांच्या कुटुंबाचा फारसा कोणाशी संबंध नसल्याने व ते मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने या कुटुंबाविषयी अथवा शहनाज विषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र, गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून पोलिसांनी शेवटी काहीशा संघर्षाला तोंड देत शहनाज व कार्तिक यांची सुटका केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.