लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घडले आहे. रेल्वे स्टेशनवर बोलावत राजस्थानाच्या दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घडले आहे. तरुण रेल्वेने गावी जात असताना जागेच्या वादातून जमावाने त्याच्यासह आणखी एकावर चाकू हल्ला केला. त्यात या २७ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेतील हल्लेखोरांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण तापले होते.










