नाशिक – आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि तक्रारीबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आज निवेदन दिले. आदिवासी मंत्र्यांशी याप्रकरणी लकीभाऊ जाधव यांनी सकारात्मक चर्चा केली.

व्यक्तिगत लक्ष घालून लवकरच या सर्व समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी लकीभाऊ जाधव यांना दिले. आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहाराच्या डीबीटीमध्ये वाढ करावी किंवा डीबीटी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी. तालुका, जिल्हास्तरावर आदिवासी मुला/ मुलांच्या वसतिगृहांची संख्या वाढवावी. पं. दीनदयाळ स्वयंम योजनेत महागाईच्या दृष्टीने वाढ करावी. ह्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील सर्व कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थ्याना लागू करावा. 2023-2024 चे ह्या योजनेचे प्रलंबित असणारे पूर्ण पैसे विद्यार्थ्यांना तत्काळ मिळावे. 2024-2025 चा एकच हप्ता मिळाला असून सर्व पैसे विद्यार्थ्याना तत्काळ द्यावेत. TRTI च्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातील काही प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देत नाही. विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी येत असल्याने अशा खाजगी प्रशिक्षण केंद्राला दिलेली योजना बंद करून चांगल्या प्रशिक्षण केंद्रांची निवड करावी. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्याना अजून अनुपलब्ध निधी तात्काळ मिळावा. आश्रमशाळामधील इ 1 ली ते 4 थी चे वर्ग बंद करू नये आदी मागण्या लकीभाऊ जाधव यांनी मांडल्या. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे लकीभाऊ जाधव यांना सांगितले.









