थंडीच्या दिवसांत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी हेतार्थ सहाय्यम संस्था ने सामाजिक बांधिलकी जोपासत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला.संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री शर्मा आणि सचिव सौ. सुनीता चौधरी यांनी पुढाकार घेऊन वृद्धाश्रमातील वयस्कर स्त्री-पुरुषांना उलन शालींचे वाटप केले. या उपक्रमामध्ये संस्थेच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याची जबाबदारी उचलली.

या प्रसंगी सौ. राजश्री शर्मा म्हणाल्या, “वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आपली एक कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांची काळजी घेणे आणि त्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे हा आमचा मुख्य उद्देश होता.”सुनीता चौधरी यांनी यावेळी सांगितले की, “संस्था नेहमीच समाज उपयोगी कामांसाठी तत्पर असते. वृद्धांना आनंद मिळवून देणे हेच खरे समाधान आहे.”हेतार्थ सहाय्यम संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वेळोवेळी उपक्रम राबवत असते. गरजूंसाठी शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण संरक्षण, आणि महिला सक्षमीकरणासाठी संस्थेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.समाजाच्या सेवेसाठी संस्थेची वचनबद्धता हा उपक्रम केवळ एका वस्त्रवाटप कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर सामाजिक बांधिलकीचे एक जिवंत उदाहरण आहे. समाजातील प्रत्येक घटकाने ज्येष्ठ नागरिकांसाठी या प्रकारे पुढाकार घेतल्यास, वृद्धाश्रमातील प्रत्येकाला आत्मीयतेचा आधार मिळू शकेल.हेतार्थ सहाय्यम संस्था यापुढेही अशा समाजसेवेसाठी कटिबद्ध राहील. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेले समाधानाचे हसू हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचा खरा पुरावा ठरले.आपणही या संस्थेशी संपर्क साधून समाजासाठी योगदान देऊ शकता!









