निवडणुकीच्या रणधुमाळीत अरविंद केजरीवालांच्या कारवर हल्ला; ‘आप’चा भाजपवर निशाणा.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून (AAP) करण्यात आला आहे . निवडणूक प्रचारादरम्यान आप आणि भाजपमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाचा हा परिणाम म्हणून हे घडल्याची माहिती आहे.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून (AAP) करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली मतदारसंघात सुरु असलेल्या प्रचारादरम्यान हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचारादरम्यान आप आणि भाजपमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाचा हा परिणाम म्हणून हे घडल्याची माहिती आहे.

आम आदमी पक्षाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर व्हिडीओ शेअर करत हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचार करत असताना विटा आणि दगडांनी हल्ला केला आहे. तसेच त्यांनी प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत पोहोचवली असल्याचा दावाही करण्यात आला. तसेच पक्षाने भाजपला खडेबोल देखील सुनावले आहेत. ‘भाजपवाल्यांनो, केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील.’ असेही ट्विटमधून सुनावण्यात आले.मात्र भाजपच्या परवेश वर्मा यांनी ‘आप’ने केलेला आरोप फेटाळला आहे. तर उलटपक्षी आप पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच हिंसाचार आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘अरविंद केजरीवालांचे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत.’ परवेश वर्मा म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री नगर येथे घरोघरी केजरीवाल प्रचार करत असताना विशाल, अभिषेक आणि रोहित या तीन बेरोजगार तरुणांनी रोजगाराच्या प्रश्नावर केजरीवालांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पंजाब पोलिसांनी त्या तरुणांना मारहाण केली. तर केजरीवालांच्या गाडीनेही त्या तिघांना धडक दिली, असा गंभीर आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे. ड्रायव्हर ब्रेक लावत असतानाही केजरीवालांनी त्यांना गाडी पुढे नेण्यास सांगितले. हा हत्येचाच प्रयत्न होता, असा दावाही शर्मा यांनी केला आहे.पुढे परवेश यांनी असाही दावा केला की, अरविंद केजरीवालांची गाडी भाजपच्या कार्यकर्त्याला चिरडून पुढे गेली. यामध्ये त्याचा पाय तुटला आहे. त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.