तीच पद्धत, तेच ठिकाण; सरपंचाप्रमाणे ९ महिन्यांपूर्वी अवादा कंपनीच्या मॅनेजरचंही झालेलं अपहरण, मग…

ज्याप्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याचप्रकारे ९ महिन्यांपूर्वी अवादा कंपनीच्या मॅनेजरचंही अपहरण करण्यात आलं होतं.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार या सहा जणांचा समावेश असल्याचं समोर आलं होतं. तसेच, याप्रकरणात विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान आता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

२१ मे २०२४ ला म्हणजेच नऊ महिन्यांपूर्वी बीडच्या मस्साजोग या रोडवरील असलेला मस्साजोग येथील टोल नाक्यावर अवादा कंपनीचे मॅनेजर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. संतोष देशमुख अपहरणामध्ये गुन्हेगारांनी काळी स्कॉर्पिओ वापरली होती, तर आवादा कंपनीच्या मॅनेजरचं अपहरण करताना पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणातही रमेश घुले आणि इतर काही लोकांनी त्यांना खंडणी मागितली होती, असा आरोप आहे.हा सगळा प्रकार २१ मे च्या रात्री अकरा वाजता घडला होता. त्या रात्री सुनील शिंदे यांचं मस्साजोग येथील टोल नाक्यावरुन अपहरण केलं आणि रमेश घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे सोडलं होतं. यावेळी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली होती, अशीही माहिती आहे. याप्रकरणी केज पोलिसांमध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता.यानंतर ९ महिन्यांनी याच टोलनाक्यावरुन संतोष देशमुख यांचे देखील अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या अपहरणानंतर त्यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यामुळे हा टोल नाका आता चर्चेचा मुद्दा ठरला आहे. मे महिन्यामध्ये सुनील शिंदे यांचा अपहरण करताना गावठी कट्टा देखील वापर आल्याची माहिती समोर येत आहे. तर, काही किलोमीटरवर गेल्यानंतर एका बंद हॉटेलमध्ये सुनील शिंदे यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. काही वेळ त्यांच्यासोबत तिथे रमेश घुले आणि त्याचे साथीदार त्यांच्याशी बातचीत केली होते. त्यानंतर त्यांना पाथर्डीमध्ये सोडण्यात आलं अशी माहिती समोर येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.