तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढला

आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

वास्तविक, वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच TTD तिरुमला येथील भाविकांना दहा दिवसांसाठी वैकुंठ द्वार दर्शन देणार आहे. १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे एसएसडी टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन वितरित करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली परंतु आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली आहे.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाविकांचा मृत्यू झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

तर त्यांनी घटनेतील जखमींना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा देखील केली आहे.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या घटनेप्रकरणी उच्चस्तरिय बैठक बोलावून आढावा घेतला आहे. DGP, TTD EO, जिल्हाधिकारी, SP यांच्यासमवेत चेंगराचेंगरीच्या या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मृत्यू हे अतिशय दु:खद आहे. भाविक मोठ्या संख्येने येणार हे माहित असताना त्यानुसार व्यवस्था का करता आली नाही, असा सवाल मुख्यमंत्री नायडू यांनी केला. मृतांची संख्या वाढू नये, यासाठी सीएम नायडू यांनी जखमींना चांगले उपचार मिळवून देण्यासाठी आणि मृतांचा आकडा वाढू नये यासाठी दक्ष राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तर मुख्यमंत्री उद्या स्वत: घटनेतील जखमींची भेट घेणार आहेत आणि परिस्थितीचा प्रत्यक्षरित्या आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.