मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, संतोष देशमुख हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी

बीड येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. याप्रकरणातील तीन आरोपी अजून फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. याप्रकरणात गंभीर आरोपही केले गेले. बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. अजूनही संतोष देशमुख हत्येप्रकरणातील तीन आरोपी मोकाट आहेत. पोलिस त्यांच्या शोधात आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. सातत्याने कराडच्या अटकेची मागणी केली गेली. मंगळवारी 22 दिवसांपासून फरार असलेला कराड सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत शरण आला. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड आहे. पुण्यातून बीडमध्ये आणून केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रात्री केज कोर्टाबाहेर मोठा ड्रामा देखील बघायला मिळाला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करा, ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे आंदोलन सुरू केले. हेच नाहीतर याप्रकरणातील आरोपींनी अटक करून तात्काळ फाशी द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बीडच्या संतोष देशमुख हत्येनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष हे बीडकडे लागले आहे. तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. अंजली दमानिया यांनी फरार तीन आरोपींबद्दल मोठा दावा केला होता. मात्र, त्याबद्दल अजूनही काही पुरावे हे मिळाले नाहीत. आरोपी कोणीही असो कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केले. यासोबतच माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..