एवढी कलमं लावू, राहुल गांधीही वाचवू शकणार नाही; परमार दाम्पत्याने आयुष्य संपवलं,

घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील उल्लेखानुसार ईडी अधिकारी परमार दाम्पत्याला म्हणाले की ‘इतकी कलमं लावेन, की राहुल गांधी पंतप्रधान झाले, तरी ती हटवू शकणार नाहीत’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्याय यात्रेच्या वेळी आपली पिगी बँक भेट देणाऱ्या चिमुकल्यांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज आणि नेहा परमार असे मृत जोडप्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील राहत्या घरी दाम्पत्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. ईडीच्या नोटिशीनंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या धाकदपटशामुळे दोघांनी जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील उल्लेखानुसार ईडी अधिकारी परमार दाम्पत्याला म्हणाले की ‘इतकी कलमं लावेन, की राहुल गांधी पंतप्रधान झाले, तरी ती हटवू शकणार नाहीत’

उद्योगपती मनोज परमार आणि पत्नी नेहा यांच्या मुलांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत त्यांना खाऊचे पैसे असलेली पिगी बँक भेट दिल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परमार यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे, की अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे या जोडप्याला प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता. परमार यांना तीन मुलं आहेत. १८ वर्षांच जिया, १६ वर्षांचा जतीन आणि १४ वर्षांचा यश. सीबीआयच्या २०१७ मधील एफआयआरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने ५ डिसेंबर रोजी इंदूर आणि सीहोरमधील परमार यांच्याशी संबंधित चार मालमत्तांवर छापे टाकले होते. यावेळी विविध जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती देणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तर त्यांच्या बँक खात्यातील साडेतीन लाख रुपये गोठवण्यात आले होते. राष्ट्रीयीकृत बँकेची ६ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी परमार यांना अटकही करण्यात आली होती. ईडीच्या कारवाईमुळे परमार दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. परमार यांच्या भावाने सांगितले की, कायदेशीर कारवाई आणि तपासामुळे दोघांना गंभीर मानसिक त्रास झाला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कैलाश परमार म्हणाले की, मनोज परमारच्या मुलाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत, प्रतीकात्मक “गुलक” (पिग्गी बँक) भेट देण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मनोज परमार यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१७ मधील सीबीआयच्या एफआयआरमध्ये, त्यांच्यावर बनावट कागदपत्रे आणि टीआयएन क्रमांक देऊन कोट्यवधी रुपयांच्या फसव्या कर्जाची सुविधा केल्याचा आरोप होता. मध्य प्रदेश हायकोर्टाने २०२२ मध्ये एफआयआर रद्द करण्याची त्यांची याचिका फेटाळून लावली, सीबीआयला १८ संशयास्पद कर्ज व्यवहारांचा तपास सुरू ठेवण्याची परवानगी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.