घरातून निघाल्या अन् २० मिनिटात सारं संपलं, लेकाच्या लग्नापूर्वी फातिमा यांचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आपल्या आईला गमावलेल्या आबिद शेख यांनी हा अपघात यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. तसेच, पैसे नकोत आरोपीवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. कुर्ला येथे घडलेल्या बेस्ट बस अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुर्ल्यातील एलबीएस रस्त्यावर ही भीषण घटना घडली. या अपघातात इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं, त्यात ४९ जण जखमी झालेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांसाठी १० लाखांची मदत जाहीर या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच, जखमींवर मोफत उपचार केला जाणार असल्याचंही सांगितलं. मात्र, रुग्णालयात काही वेगळंच चाललंय, अशी परिस्थिती आहे. सरकारची पाच लाखांची मदत नको, दोषींवर कारवाई करा, अशी मागणी या अपघातात आपल्या आईला गमावलेल्या एका मुलाने केली आहे. या अपघातात ५५ वर्षीय कणिस फातिमा यांचाही मृत्यू झाला. त्या आपल्या कामावर जात असताना बसने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या बस आणि कारच्या मध्ये अडकल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घर सोडल्याच्या २० मिनटांतच हे सारं घडलं होतं. त्या कुर्ल्यातील देसाई रुग्णालयत काम करायच्या. त्यांची रात्रपाळी असल्याने त्या कामाला जात होत्या. तेवढ्यात या बेस्ट बसने त्यांना धडक दिली. त्या काम करत असलेल्या रुग्णालयासमोरच त्यांचा मृत्यू झाला.

घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती फातिमा यांच्या मुलाचं लग्न असलेल्याने घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र, लेकाचं लग्न पाहण्यापूर्वीच फातिमा हे जग सोडून गेल्या. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. फातिमा यांचा मुलगा आबिद शेखला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. त्याने प्रशासनाला यासाठी जबाबदार धरलं आहे. तसेच, आईचा मृतदेह नेण्यासाठीही आमच्याकडे पैसे मागण्यात आले, असंही आबिद शेख यांनी सांगितलं. तसेच, माझ्या आईचा मृत्यू हा अपघात नाही तर अनेक यंत्रणांचे अपयश आहे. त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.