घटनेनंतर धडक दिलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतत होणाऱ्या अपघाताची चिंता व्यक्त केली जात असतानाच चंद्रपूर शहरात घडलेल्या अपघाताने जिल्हा हादरला आहे. नव्याने वाहतुकीसाठी खुला झालेला बाबूपेठ उड्डाण पुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकी थेट पुलावरुन खाली कोसळली. या अपघातात दोन तरुणांचा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आर्यन विठ्ठल मेश्राम (वय १७, रा. माजरी, ता. भद्रावती) आणि रवी ऊर्फ साहिल संजय ढवस (वय २१) असे मृतकांची नाव आहेत. सुयोग सुरेश डांगे (चिमूर) हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.










