शरीराने धिप्पाड, फॉर्च्युनरमधून उतरला, ग्राहकाला गुंड समजले; छातीत वार करुन इंजिनिअरला संपवले.

संतोष राजू पेड्डी (वय २८, रा. राज ज्योती नगर उस्मानपुरा) असं मयत अभियंताचं नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू याने अभियंतेचं शिक्षण घेतलं होतं.  हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर जेवणासाठी आलेल्या अभियंत्याला हॉटेलचा मालक समजून टोळक्याने चाकूने भोसकून अभियंत्याचा खून केला. ही घटना जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे यशवंत हॉटेल मध्ये शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष राजू पेड्डी (वय २८, रा. राज ज्योती नगर उस्मानपुरा) असं मयत अभियंताचं नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू याने अभियंतेचं शिक्षण घेतलं होतं. तो एका सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी करत होता. कंपनीत तो वर्क फ्रॉम होम काम करत असल्यामुळे तो संभाजीनगर येथील घरूनच ते काम करत होता. दरम्यान, संतोष पेड्डी याच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे कुटुंबातील व्यक्ती हे हैदराबादला लग्नासाठी गेले होते. यामुळे संतोष हा घरी एकटाच होता. रात्री उशीरापर्यंत वर्क फ्रॉम होम काम केल्यानंतर संतोष हा जेवण करण्यासाठी चालत जालना रोडवर आला. तो झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये जेवणासाठी पोहोचला.दरम्यान, त्याचवेळी हॉटेलमध्ये त्याला एका टोळक्याने बळजबरीने जेवण मागितले. त्यानंतर त्या टोळक्याने स्वतः फ्रीजमधून स्प्राईटची बॉटल घेतली. त्यानंतर त्यांचे हॉटेल कर्मचाऱ्यांशी पैसे मागितल्यावर वाद झाला. त्याचवेळी संतोष पेड्डी हा फॉरच्यूनर कारमधून उतरला. संतोष यांची शरीरयष्टी बघून हॉटेल चालकाने आपल्याला मारायला लोकं बोलवली, असा गैरसमज डोळक्याचा झाला. यावेळी क्षणाचाही विचार न करता टोळक्याने संतोष याच्यावर हल्ला चढवला. संतोष याच्या छातीत चाकूने भोसकले आणि तो रक्तबंबाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असते त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.दरम्यान, पैठण तालुक्यातील जुने कासवन गावात चार वर्षांपूर्वी घरात घुसून एकाच कुटुंबातील आई, वडील व दहा वर्षीय मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणात अक्षय प्रकाश जाधव (२७, रा. माळवाडी, सोलनापूर शिवार, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला तिहेरी जन्मठेपेसह एकूण ४० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी नुकतीच ठोठावली. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम मृताच्या वारस मुलाला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.