परभणीतील वीज वितरणाचा बोजवारा; ठाकरेंच्या आमदाराने ऊर्जा राज्यमंत्र्यांसमोरच महावितरणचे काढले वाभाडे.

मागेल त्याला सौर ऊर्जा हे धोरण शासनाने अवलंबिलं आहे. मागेल त्याला सौर पंप म्हणतात आणि सहा सहा महिने पंप देत नाहीत? शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार का? असे सवाल आमदार राहुल पाटील यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर उपस्थित केले आहेत. मागेल त्याला सौर ऊर्जा हे धोरण शासनाने अवलंबिलं आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये २५ हजार ९४६ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी पैसे भरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६५३१ लोकांनाच सौर कृषी पंप मिळाले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री म्हणतात की, या योजनेत १६ हजार शेतकऱ्यांची निवड झाली आहे आणि त्यापैकी ९ हजार शेतकऱ्यांची अद्याप स्क्रुटनिच करणे बाकी आहे. मग सहा सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून सौर पंपासाठी पैसे जमा करून का घेतले? मागेल त्याला सौर पंप म्हणतात आणि सहा सहा महिने पंप देत नाहीत? शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार का? असे सवाल आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत परभणीच्या पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर उपस्थित केले आहेत.

आमदार राहुल पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्यात जवळपास साडेआठशे गावे आहेत. पण या गावांमध्ये लाईनस्टाफ केवळ ५३९ एवढाच आहे. गावाला एक लाईनमन देखील परभणी जिल्ह्यात नाही त्यामुळे विजेचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत. परभणी शहरात काही दिवसांपूर्वी पावर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता. मागील दोन महिन्यांपासून परभणी शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण कडे परभणी जिल्ह्यात एकही स्टॅन्ड बाय पॉवर युनिट नाही. परभणी जिल्ह्यात महावितरणचा पुरता बोजवारा उडालेला आहे. शेतकऱ्यांना सौर पंप मिळत नाही तर शहरी भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्याच्या आहेत. आणि त्यांच्या जिल्ह्यातच महावितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. राज्यमंत्री बोर्डीकर परभणी जिल्ह्याला न्याय देतील का? असा सवाल देखील यावेळी आमदार राहुल पाटील यांनी उपस्थित केला.राहुल पाटील यांच्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, मागील त्याला सौर पंप ही योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप मेळावा यासाठी प्रचंड मागणी केली आहे.

पूर्वी दरवर्षी तीन ते चार हजार नवीन कृषी पंपासाठी मागणी येत होती पण आता सौर पंपासाठी २५ हजार शेतकऱ्यांनी मागणी केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मागणी झाल्याने शेतकऱ्यांना सौर पंप देण्यास विलंब होत आहे पण असे असले तरी आपण १२० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना सौर पंप देण्या संदर्भात कारवाई करत आहोत.सौर पंप बसविण्यास विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई देखील करण्यात येत असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या.एकंदरीतच परभणी जिल्ह्याला पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री पद हे स्थानिक आमदार वेगळा बोर्डीकर यांना मिळाले आणि त्यामुळे परभणीकरांच्या त्यांच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत. पण असे असतानाही त्यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाने मात्र परभणी जिल्हा वासियांना पूर्णतः नाराज केले आहे. मागील चार महिन्यांपासून परभणी जिल्ह्यामध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर लपंडाव सुरू आहे. शहरी भागातही तीन-तीन दिवस वीज गायब होत आहे तर ग्रामीण भागात सौर पंपासाठी शेतकऱ्यांना सहा सहा महिने वाट बघावी लागत आहे. डीपी जळाला तर लवकर ट्रांसफार्मर मिळत नाही त्यामुळे परभणीकर विजेच्या बाबतीत त्रस्तच आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.