उद्धव ठाकरेंना विदर्भात मोठा धक्का; उबाठाच्या जिल्हाध्यक्षांचाच जय महाराष्ट्र, लवकरच भाजपात प्रवेश.

 उद्धव ठाकरेंना विदर्भात मोठा धक्का बसणार आहे. उबाठाचे जिल्हाध्यक्ष पक्षाला जय महाराष्ट्र करत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा जोरदार पराभव केला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षांना रामराम ठोकत महायुतीच्या दिशेने वळत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकामागे एक धक्के गेल्या काही दिवसांपासून बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूरचे (Chandrapur) जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) हे पक्षाला जय महाराष्ट्र करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले रवींद्र शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र शिंदे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर यापूर्वी चार वेळा संचालक म्हणून निवडून आले असून, बँकेच्या राजकारणात त्यांची ओळख ‘किंगमेकर’ अशी आहे. चंद्रपूर बँकेवर भाजपचा अध्यक्ष? यंदा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 21 संचालकांपैकी 9 जागांवर भाजप समर्थक उमेदवार निवडून आले आहेत. ही कामगिरी बँकेच्या इतिहासात भाजपसाठी पहिलीच एवढ्या मोठ्या प्रमाणावरची आहे. त्यामुळेच, शिंदेंच्या राजकीय ताकदीची आणि बँकेत त्यांच्या प्रभावाची दखल घेऊन भाजपकडून त्यांना अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार बंटी भांगडिया यांची खेळी निर्णायक ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बँकेवर आपली ताकद वाढवली असून पहिल्यांदाच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा अध्यक्ष बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्याकडे स्वतःचे 4 ते 5 संचालक असल्याने त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.काँग्रेसच्या वर्चस्वालाही धक्का दरम्यान, आजवर काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संचालक निवडून आले आहेत. हे काँग्रेससाठी मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे. शिंदे यांचा भाजप प्रवेश आणि अध्यक्षपदाच्या शक्यतेमुळे, बँकेच्या नेतृत्वाची दिशा आणि धोरणे देखील बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.