पूर ओसरला, समस्या कायम; संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच चूल मांडली.

सध्या विदर्भात पावसाने दाणादाण माजवली आहे. भंडाऱ्यात मुसळधार पावसात अशोकनगर-फुलमोगरा ते शिंगोरी हानवीन बायपास मार्ग खचला, नागरिकांमध्ये संताप.शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अशोकनगर-फुलमोगरा ते शिंगोरी हानवीन बायपास मार्ग तयार करण्यात आला. परंतु, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता ठिकठिकाणी खचला. विविध ठिकाणी रस्ता दबला असून पिचिंग व बॅरिकेड्स्‌ तुटलेले आहेत. भंडारा शहरात महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता जागा नसल्याने फुलमोगरा ते शिंगोरीदरम्यान बायपास मार्ग तयार करण्यात आला असून कोरंभी येथे वैनगंगेवर मोठा पूलही बांधण्यात आला आहे.मात्र, या रस्त्याचे काम सुरू असताना घाईघाईत काम केले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला होता. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून झालेल्या संततधर पावसामुळे बायपास मार्गावरील सर्व ठिकाणी पिचिंग व लावलेले बॅरिकेड्स पाण्याने वाहून गेले. भिलेवाडा, पलाडी या गावांजवळ रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली की, कंत्राटदाराकडून दुरुस्ती करूनही रस्त्याची अवस्था बिकटच आहे. जागोजागी रस्ता दबलेला आहे. पीचिंग वाहून गेले, तर बॅरिकेड् तुटलेले आहेत. हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. पलाडी गावाजवळील जंक्शनवर कोका, पलाडी, टेकेपार या गावांना जाण्यासाठी अंडरपाससुद्धा दिलेले नाही.संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पूरही ओसरला.

परंतु, दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या गावांच्या समस्या मात्र कायम आहेत. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी बाधित होणाऱ्या गावांचे तत्काळ पूनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी गावकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कार्यालयाच्या आवारात चूल मांडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस २२ बाधित गावांचे तत्काळ पूनवर्सन करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गोसेखुर्द धरणातील पाणी अडवल्याने नदी आणि नाल्यांचे बॅकवॉटर अनेक हेक्टरपर्यंत पोहोचले. पुराचे पाणी गावात शिरल्याने दरवर्षी शेकडो लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या सहा वर्षांपासून गावकरी या गावांच्या पुनर्वसनाची मागणी करीत आहेत. याहीवर्षी सलग दोन दिवसांच्या पुरामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. पुरामुळे कारधा, भोजापूर, खमारी, चिचखेडा या गावांमध्ये पाणी शिरले. घरे उद्‌ध्वस्त झाली. दरवर्षी होणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चूल मांडून अनोखे आंदोलन केले. चूल पेटविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कार्यालयाच्या आवारात येऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला. अखेरीस गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन १९८३मध्ये झाले. पवनी तालुक्यातील गोसे गावालगत हा धरण बांधण्यात आला. त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे बाधित झालेल्या एकूण ३४ गावांचे पूनर्वसन करण्यात आले. परंतु, गोसेखुर्द धरणाची अखेरची पाणीपातळी तपासण्यासाठी धरणातील पाणी अडविण्यात आले होते.

तेव्हा अनेक गावे बॅकवॉटरने बाधित झाली. यामध्ये प्रामुख्याने २२ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे बाधीत गावातील सुमारे ७५ टक्के जमीन गिळंकृत झाली आहे. आता फक्त काही जमीन आणि काही गावे शिल्लक आहेत. आता दोन दिवसांत आलेल्या वैनगंगेतील पुरामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली आहेत.भंडारा : शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अशोकनगर-फुलमोगरा ते शिंगोरी हानवीन बायपास मार्ग तयार करण्यात आला. परंतु, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता ठिकठिकाणी खचला. विविध ठिकाणी रस्ता दबला असून पिचिंग व बॅरिकेड्स्‌ तुटलेले आहेत.भंडारा शहरात महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता जागा नसल्याने फुलमोगरा ते शिंगोरीदरम्यान बायपास मार्ग तयार करण्यात आला असून कोरंभी येथे वैनगंगेवर मोठा पूलही बांधण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याचे काम सुरू असताना घाईघाईत काम केले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला होता. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून झालेल्या संततधर पावसामुळे बायपास मार्गावरील सर्व ठिकाणी पिचिंग व लावलेले बॅरिकेड्स पाण्याने वाहून गेले. भिलेवाडा, पलाडी या गावांजवळ रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली की, कंत्राटदाराकडून दुरुस्ती करूनही रस्त्याची अवस्था बिकटच आहे. जागोजागी रस्ता दबलेला आहे. पीचिंग वाहून गेले, तर बॅरिकेड् तुटलेले आहेत. हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. पलाडी गावाजवळील जंक्शनवर कोका, पलाडी, टेकेपार या गावांना जाण्यासाठी अंडरपाससुद्धा दिलेले नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.