माथेरान एक असं पर्यटनस्थळ आहे जीथे पावसाळ्यात पर्यटक हमखास भेट देतात. पण निसर्गाचा आस्वाद घेताना सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं. कारण जीव वाचला तरच तर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. माथेरानला आलेल्या एका हैदराबादी कुटुंबासोबत एक भयानक घटना घडली.महाराष्ट्राचं निसर्गसौंदर्य परराज्यातल्याच काय, पण परदेशातल्या पर्यटकांनाही आकर्षित करतं. त्यात मान्सून म्हटलं तर आहाssहाss बातच न्यारी. माथेरान एक असं पर्यटनस्थळ आहे जीथे पावसाळ्यात पर्यटक हमखास भेट देतात. पण निसर्गाचा आस्वाद घेताना सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं. कारण जीव वाचला तरच तर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. माथेरानला आलेल्या एका हैदराबादी कुटुंबासोबत एक भयानक घटना घडली. ‘अंगावर आले ते बोटांवर निभावले’ अशीच अवस्था या कुटुंबाची झाली.
हैदराबादहूनमाथेरानला आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले. 8 जुलै रोजी जुमापट्टी रेल्वे क्रॉसिंगजवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. कार रेलिंगला धडकून खाली कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने प्रवाशांचे प्राणवाचले.हैदराबादमधील गुंटूर जिल्ह्यातील साकेत राम, रेयूत त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी आणि तेजस्वी इम्कोरल हे 4 जुलैला माथेरानला निघाले होते. 7 जुलैला ते माथेरानला पोहोचले. माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतल्यानंतर 8 जुलै रोजी परत जात असताना दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. त्रिलोक गाडी चालवत होता.









