मुंबईतील क्रॉफर्ड जवळील कोळी बाजार वाचवण्यासाठी कोळी समाजाची अर्थशक्ती, 400 कोटी रूपये उभारणार.

मुंबईतील कोळी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी ४०० कोटी रुपये खर्चून ३० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी दर्शवली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोळी समाज या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार तयार करू इच्छितो. तसेच, समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची योजना आहे.मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी आता मासेविक्रीच्या जागांसाठी आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. क्रॉफर्ड मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी आणि मुंबईतील कोळी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ४०० कोटी रुपये देऊन ३० वर्षांचा भाडेकरार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीतर्फे सांगण्यात आले.

‘महसूल वाढवण्याच्या दृष्टीने पलटण मार्गावरील सीटीएस १५०० हा भूखंड लिलावाद्वारे खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपये रकमेत देण्यात आल्याचे समजल्यानंतर या भूखंडावर असलेल्या मासळी बाजाराबद्दल कोळी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाच दशकांपासून येथे मासळी बाजार आहे. या भागात सुमारे ३४८ परवानाधारक व्यापारी आहेत, अशी माहिती मच्छिमार भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीतर्फे सांगण्यात आले. ‘महसूल वाढवण्याच्या दृष्टीने पलटण मार्गावरील सीटीएस १५०० हा भूखंड लिलावाद्वारे खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपये रकमेत देण्यात आल्याचे समजल्यानंतर या भूखंडावर असलेल्या मासळी बाजाराबद्दल कोळी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाच दशकांपासून येथे मासळी बाजार आहे. या भागात सुमारे ३४८ परवानाधारक व्यापारी आहेत, अशी माहिती मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.

मुंबईतून कोळी बांधवांना हद्दपार करण्यासाठी त्यांच्या उपजीविका बंद पाडण्याचे नियोजन केले जात आहे,’ असा आरोप या कोळी बांधवांनी केला. ‘मुंबई महापालिकेच्या अटी-शर्तीच्या अधीन राहून क्रॉफड येथील दोन एकर क्षेत्रफळाचा भूखंड ३० वर्षांच्या भाडेकराराने घेण्यासाठी कोळी समाजाने पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये ३६९ कोटी रुपयांना हा भूखंड देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर यापेक्षा अधिक पैसे मोजण्याची तयारी कोळी बांधवांनी दाखवली,’ असेही तांडेल म्हणाले. ‘महामुंबई परिसरच नाही, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून, तसेच पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही या बाजारात माशांचे संकलन होते. त्यामुळे हा भूखंड कोळी समाजाला मिळाला, तर तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार तयार करण्यात येईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.