कर्मचारी शासकीय असो वा नसो, पगाराव्यतिरिक्त वरची मलई खाण्याचा नाद लागला कि असे लाचखोर सावज हेरतात अन् एखाद्या अडलेल्या व्यक्तीला चांगलाच बळीचा बकरा बनवतात. पण आपल्या हक्कांची जाणीव असेल तर व्यक्ती अशा लाचखोरांपासून स्वतःला वाचवूही शकते आणि वरची मलई खाणाऱ्याला खडीही चारू शकते.जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये लाचखोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन आणि लिपिक आशिष पाटील यांना ACB (अँटी करप्शन ब्युरो) च्या पथकाने 36 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका शिक्षिकेच्या प्रसूती रजा मंजुरीसाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
पैशाचा मोह भल्या भल्यांची मती फिरवतो. लाच घेणे आणि देणे गुन्हा असला तरी एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेऊन त्याच्याकडून पैसे उकळणं याबद्दल लाचखोर निर्ढावलेले दिसतात. आणि आपलं काम कोणत्याही अडथळ्याविना पार पडावं यासाठी हतबल व्यक्ती लाचखोरांच्या हिमतीला खतपाणी घालतात. कर्मचारी शासकीय असो वा नसो, पगाराव्यतिरिक्त वरची मलई खाण्याचा नाद लागला कि असे लाचखोर सावज हेरतात अन् एखाद्या अडलेल्या व्यक्तीला चांगलाच बळीचा बकरा बनवतात.पण आपल्या हक्कांची जाणीव असेल तर व्यक्ती अशा लाचखोरांपासून स्वतःला वाचवूही शकते आणि वरची मलई खाणाऱ्याला खडीही चारू शकते. ही घटना आपल्याला हेच दाखवते की फक्त शिक्षित असणे महत्त्वाचं नसतं तर आपल्या अधिकारांची जाण असणं आणि स्वतःसाठी उभं राहणंही महत्त्वाचं असतंतक्रारदार हे 61 वर्षांचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत.









