नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसलीसुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर जेवण करण्यासाठी गेलेल्या बँक मॅनेजरवर नियतीने घाला घातला. एका विचित्र अपघातात अज्ञात वाहनाने चिरडले आणि 30 वर्षीय बँक मॅनेजर आशिष देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही मन हेलावून लावणारी घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे बँक मॅनेजरच्या सोयरीकीचा कार्यक्रम आज होणार होता. विवाहाची गाठ जुळण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार हरपल्याने पंचक्रोशीत शोक व्यक्त केला जात आहे.
मयत आशिष देशमुख हे मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते. दोन वर्षांपासून ते नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील निवघा बजार येथील आयडीबीआय बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.काही दिवसांपूर्वी त्यांची लोहा तालुक्यात बदली झाली होती. ड्युटीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी तयारी केली. दरम्यान शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने सहकारी मित्रांसोबत त्यांनी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला.नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसली.









