रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली एक संशयित बोट, पाकिस्तानी खूण, संपूर्ण यंत्रणा अलर्टवर.

कोलई समुद्रात दिसलेली ती बोट पाकिस्तानची असल्याचा संशय आहे. त्या बोटीवर पाकिस्तानी खूण दिसून आली आहे. 23 एप्रिल 2025 ला काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अतिरेकी यांनी भारतीय पर्यटक यांच्यावर काश्मीर मधील पहलगाम येथे हल्ला करून निष्पाप पर्यटक यांचा जीव घेतला. तर कही पर्यटक जखमी झाले असल्याची घटना घडल्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानसोबतचा करार स्थगित केल्याची घोषणा केली. त्याच बरोबर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल (साधारण साडे पाच किलोमीटर अंतरावर) एक संशयीत बोट दिसली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.

रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात दिसत असलेली बोट ही पाकिस्तानची असल्याची चर्चा ही रेवदंडा सहित जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सदर बोट ही समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल खोल समुद्रात ही बोट आढळली असून वादळी वातावरणामुळे या बोटीपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही. यामुळे आता नौसेना तटरक्षक दलाच्या बोटीमधून त्या संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.. दरम्यान, रायगड जिल्ह्यासह किनारपट्टी वरील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढळल्या संशयित बोटीपर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला असून मुरुड तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जने संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रेवदंडा समुद्रात एक संशयास्पद बोट आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या घटनेमुळे परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या संशयित बोटीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.स्थानिक नागरिक आणि मच्छीमार यांच्यामध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलिसांना त्वरित कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पाकिस्तानी अतिरेकी कसाब आणि त्याचे साथीदार हे कराची येथून मुंबईत समुद्रमार्गे दाखल होत त्यांनी मुंबई वर २६नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता.त्य दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.एका पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती बोट समुद्रात कुठेतरी निघून गेली असून ती बोट शोधण्यासाठी रायगड पोलिस, सहित तपासी यंत्रणा यांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.