घोडा मैदान जवळ असून, या निवडणुकीत ताकद कोणाची आहे ते दिसेलच,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना एकत्रितच होती. त्यामुळे कोण एकत्रित येणार यापेक्षा आपला पक्ष मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच घोडा मैदान जवळ असून, या निवडणुकीत ताकद कोणाची आहे ते दिसेलच,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
‘एनडीए’सोबत राहण्याचा आमचा निर्धार पक्का असून, आमच्या विचारधारा ज्यांना मान्य असेल ते सोबत येऊ शकतात,’ असे भाष्यही त्यांनी पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणावर केले. ‘महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाली,’ असा दावाही तटकरे यांनी केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टिने सुनील तटकरे यांनी उत्तर महाराष्ट्रापासून दौऱ्याला सुरुवात केली. नाशिकमध्ये शनिवारी (दि. ५) राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांनी आढावा घेतला.

या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करणे, नवीन आलेल्यांना सन्मानाने सोबत घेणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्षाची सध्याची राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी हा दौरा सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘एनडीएसोबत जाण्याविषयी यापूर्वीदेखील आमची भूमिका होती. आजही तीच भूमिका आहे. आगामी निवडणूक एकत्रित लढविण्याविषयी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली असली तरी अद्याप त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.निवडणूक काळापर्यंत काय स्थिती असेल त्यावर बरेच काही अवलंबून असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. एकट्या नाशिकमधून पक्षाचे सात आमदार निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. यामुळे त्याचा निश्चितच विचार करून कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ , आमदार पंकज भुजबळ, सरोज अहिरे, रवींद्र पगारे, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.निवडणूक काळापर्यंत काय स्थिती असेल त्यावर बरेच काही अवलंबून असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. एकट्या नाशिकमधून पक्षाचे सात आमदार निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. यामुळे त्याचा निश्चितच विचार करून कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ , आमदार पंकज भुजबळ, सरोज अहिरे, रवींद्र पगारे, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.निवडणूक काळापर्यंत काय स्थिती असेल त्यावर बरेच काही अवलंबून असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. एकट्या नाशिकमधून पक्षाचे सात आमदार निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. यामुळे त्याचा निश्चितच विचार करून कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ , आमदार पंकज भुजबळ, सरोज अहिरे, रवींद्र पगारे, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.
Post Views: 5,493