सोमवार पेठेत वनविभागाची मोठी कारवाई; साडेचारशे किलो मोरपिसे जप्त, उत्तर प्रदेशचे आरोपी ताब्यात.

श्रावणातील विविध सण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह गृहसजावटीसाठी मोरपिसांना सर्वाधिक मागणी असते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मोरपिसे दाखल झाली.उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून मोरपिसांची तस्करी करणाऱ्या ११ संशयितांना वन विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारशेहून अधिक किलो वजनाची मोरपिसे जप्त करण्यात आली आहेत. नरपतगिरी चौक परिसरात (सोमवार पेठ) ही कारवाई केली असून, त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.श्रावणातील विविध सण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह गृहसजावटीसाठी मोरपिसांना सर्वाधिक मागणी असते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मोरपिसे दाखल झाली. या दाखल झालेल्या मोरपिसांवर वन विभागाने कारवाई केली असून, सुमारे चारशे ते पाचशे किलो मोरपिसे जप्त करण्यात आली आहेत.शहरात मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची वाहतूक होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्याआधारे विभागाच्या फिरत्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांवर कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या विक्रेत्यांकडे चौकशी केल्यानंतर आरोपींनी संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये मोराची पिसे विक्रीसाठी साठवत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तेथे सुमारे चारशे ते पाचशे किलो मोरपिसे साठवले असल्याचे आढळले. हा मुद्देमाल आणि ११ आरोपींना ताब्यात घेऊन विभागाने कारवाईचा बडगा उगारला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुट्टी मोरपिस, मोरपिसांच्या शोभेच्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) हृषीकेश चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी (भांबुर्डा) मनोज बारबोले, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक आदींनी ही कारवाई केली.वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत मोर या राष्ट्रीय पक्षाची पिसे काढणे, साठवणे, विक्री करणे आणि खरेदी करणे बेकायदा आहे. या पिसांचा उपयोग अंधश्रद्धेपोटी आणि गृहसजावटीसाठी होतो.

मात्र, यामुळे मोरांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोरपिसांची खरेदी आणि विक्री टाळावी, बेकायदा विक्री होत असल्यास याची माहिती तत्काळ वन विभागाला द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहेकापडी पिशव्या, गाठोड्यांमधून ही शेकडो किलो मोरपिसे उत्तर प्रदेशातून आणली असल्याचा संशय आहे. मात्र, ही मोरपिसे रेल्वेने आणताना रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असणारी मोरपिसे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आणताना प्रशासनाचे लक्ष गेले नाही का, असा सवाल पुन्हा एकदा या निमित्ताने उपस्थित होत आहे.वन विभागाच्या फिरत्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेले आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, ११ आरोपींना ताब्यात घेतले आहे. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.