जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराकडे ५० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अर्ध्या तासाच्या आतच ही बोट बुडाली. फेरीत एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. इंडोनेशियातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बालीजवळ एक मोठा अपघात झाला आहे. सुमारे ६५ लोकांना बेटावर घेऊन जाणारी एक फेरी बोट रात्री उलटली. या अपघातात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. फेरीतील २० जणांना वाचवण्यात यश आले आहे.










