शेखर निकमांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिलेदाराला पक्षप्रवेशासाठी साद, शिवसेना-राष्ट्रवादीत खडाखडी.

कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकारण तापलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात वाद पेटला आहे.कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या राजकारणावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) खडाजंगी सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात प्रशांत यादव यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. या सगळ्यामुळे निवडणुकीआधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. रत्नागिरीजिल्ह्यातील चिपळूणच्या राजकारणामुळे अजितदादांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट अजितदादांचे समर्थक आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांना भेटून त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. प्रशांत यादव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदय सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावरून पत्रकारांनी उदय सामंत यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना सामंत यांनी चिपळूण दौऱ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार शेखर निकम यांना लक्ष्य केले.

उदय सामंत म्हणाले, “मराठी उद्योजक मिल्क प्रॉडक्टचा स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करतो. त्याला राजकारणीविरहित प्रशासकीय स्तरावर मदतीसाठी बोलावले होते. त्याच भेटीत मी त्यांना सांगितले की, भविष्यात जर तुम्ही कोणत्या पक्षाचा विचार करत असाल, तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारावे.” सामंत यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे रत्नागिरीत आले होते. ते रस्ते सुरक्षा मंडळाच्या बैठकीसाठी आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “अजित यशवंतरावांना पक्षात घेताना विचारले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पण याहीपेक्षा जास्त टीका करणारे, एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेले, खालच्या भाषेत बोलणारे नेते आता सोबत आले आहेत. त्यामुळे कोणी कोणाला काय सांगावे?”एकंदरीत, कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. चिपळूणच्या राजकारणामुळे या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.