दौंड तालुक्यात वारकऱ्यांसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वारकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आली. तसेच, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारही करण्यात आला आहे.संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अध्यात्मिक मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटण्याचा प्रकार घडला आहे.










