जनतेला वाटतंय ठाकरे बंधू एकत्र यावेत, पण…, नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर दिलखुलास गप्पा करत नाशिकसह राज्यातील सध्याच्या प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले.राज्यात ठाकरे बंधू, तसेच पवार कुटुंब एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. दोन्ही कुटुंबांच्या एकत्रीकरणासाठी आधीही प्रयत्नही झालेत. परंतु, ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येणे कठीण असल्याचे विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. सिनेमा आणि मालिकांमुळे हिंदी आधीच घराघरात पोहचली आहे. त्यामुळे पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध करीत, पहिलीच्या मुलांवर तीन भाषांचे ओझे कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती होईल, असे वाटत नाही असे स्पष्ट मतही भुजबळांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर दिलखुलास गप्पा करत नाशिकसह राज्यातील सध्याच्या प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. याबाबत भुजबळ यांनी ठाकरे बंधू एकत्र येणे अशक्य असल्याचे म्हटले. दोघांना एकत्र आणण्यासाठी याधीही अनेकवेळा प्रयत्न झाले, परंतु त्यात यश आले नाही. पवार कुटुंबही एकत्र आले पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. ठाकरे आणि पवार कुटुंबातील भांडणे मिटली पाहिजेत, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. परंतु, सध्या तरी हे कठीण दिसत असल्याचे ते म्हणाले. मराठीच्या सक्तीवर राज्यात रणकंदन माजवण्यापेक्षा चर्चा करून हा निर्णय घेतला पाहिजे. बॉलिवूडचे सिनेमे आणि हिंदी मालिकांनी आधीच घराघरात हिंदी पोहचली आहे. त्यामुळे हिंदीला विरोध नाही परंतु, पहिलीपासून हिंदी लादण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.नाशिकचा विकास मुंबई-पुण्यासारखा नव्हे, तर नाशिकसारखाच झाला पाहिजे. नाशिकमध्ये आल्हाददायक वातावरण आहे, मुबलक पाणी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये धूर फेकणारे कारखाने नकोत. हे कारखाने शहराबाहेर ठेवा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्याऐवजी कृषिपूरक उद्योग नाशिकमध्ये आले पाहिजेत. धार्मिक शहर असल्याने येथे पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. पर्यटक आला तर तो तीन-चार दिवस थांबला पाहिजे. आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री असताना महामार्ग, अंतर्गत रस्ते, विमानतळ, बोटक्लब, कलाग्राम, सिंहस्थ घाट अशी कामे केली. परंतु, नंतर त्याची दुर्दशा झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. प्रयागराज कुंभमेळा शहराबाहेर होत असल्याने तेथील परिस्थिती वेगळी आहे. नाशिकमध्ये जागेची कमतरता आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करून कुंभमेळा यशस्वी करता येतो. मी पालकमंत्री असताना गोदावरीवर घाट बांधले, पण त्याचाही उपयोग करता आला नाही. गोदावरी सध्या गटारगंगा झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी स्वच्छ केली तरी सिंहस्थासाठी मोठे काम होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.