जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून, नोंदणी केलेल्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे.पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. यावेळी हिंदू पर्यटकांना टार्गेट करत थेट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली. धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर धाड…धाड गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. पहलगामवरील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झालीये. आता या दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम अमरनाथ यात्रेवरही झालाय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ केली आहे. 2.35 लाख भाविकांनी नोंदणी केली होती, परंतु हल्ल्यानंतर केवळ 85 हजार लोकांनी यात्रेला जाण्याचे फायनल केले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला.22 एप्रिलपूर्वी सुमारे 2 लाख 35 हजार भाविकांनी 38 दिवसांच्या यात्रेसाठी नोंदणी केली होती. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने नोंदणी केलेल्या भाविकांशी संपर्क साधला. त्यापैकी केवळ 85 हजार लोकांनीच यात्रा करण्याची तयारी दर्शवली. यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. यात्रेकरूंसाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.









