पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर; प्रशासन हाय अलर्टवर.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून, नोंदणी केलेल्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे.पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. यावेळी हिंदू पर्यटकांना टार्गेट करत थेट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली. धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर धाड…धाड गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. पहलगामवरील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झालीये. आता या दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम अमरनाथ यात्रेवरही झालाय.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ केली आहे. 2.35 लाख भाविकांनी नोंदणी केली होती, परंतु हल्ल्यानंतर केवळ 85 हजार लोकांनी यात्रेला जाण्याचे फायनल केले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला.22 एप्रिलपूर्वी सुमारे 2 लाख 35 हजार भाविकांनी 38 दिवसांच्या यात्रेसाठी नोंदणी केली होती. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने नोंदणी केलेल्या भाविकांशी संपर्क साधला. त्यापैकी केवळ 85 हजार लोकांनीच यात्रा करण्याची तयारी दर्शवली. यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. यात्रेकरूंसाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

प्रत्येक गोष्टीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.भाविकांनी जम्मूमध्ये सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकटे प्रवास न करण्याचे आणि सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले. पहलगाम हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहलगामवर हल्ला करणारे दहशतवादी अजूनही हाती लागले नाहीत. हल्ल्यानंतर ते पाकिस्तानात पळून गेल्याचा दावा केला जातोय. सुरक्षायंत्रणांकडून त्यांचा शोध हा घेतला जातोय. या हल्ल्याचे प्लॅनिंग कोणी केले, हे देखील स्पष्ट झाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.