जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी.

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून, या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाल्याचे अनेक व्हिडिओ बातम्या समोर येतात. अशा अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वर्गात शिकत आहेत.राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. वर्गात तासिका सुरू असतानाचा स्लॅबचे प्लास्टर कोसळले आणि यात बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. वाशिममधील भटउमरा गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही दुर्घटना घडली.

भटउमरा गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात तास सुरू होता अचानक एका कोपऱ्यातील स्लॅबचा भाग कोसळला. तेथे बसलेल्या विद्यार्थ्यावर त्या भागाचे तुकडे पडले ज्यात तेथे बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्याला तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. शिवाजी उमाळे विद्यार्थ्याचे नाव असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. या घटनेने शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले आहेत. तसेच पालकांनाही पाल्याबद्दलची चिंता वाढली आहे. शाळेची इमारत दहा वर्षापूर्वीच बांधण्यात आली होती.या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर येत आहे. त्यात दिसून येते की स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला असून. वर्गातील बॅंचवर बॅगवर त्याचे तुकडे पडले आहेत तसेच वर्गात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे पडल्याचे दिसत आहेत.राज्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरावस्था समोर आली आहे.

गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्यातील काही शाळांची दुरावस्था ही भीषण आहे. पावसाळ्यात अनेक शाळांमध्ये छत गळत असल्याचेही समोर येते. कोल्हापूरमधील शिये गावातील एका कन्याशाळेची अवस्थाही भयानक होती.कौल फुटली होती. इमारतीच्या काही भागाची पडझड झाली होती. अखेर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. नगरपालिकेच्या शाळेतही दुरावस्था समोर आली आहे. काचा फुटल्या आहे. भिंतींना भेगा पडल्या आहे. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था ही भीषण आहे. वाशिममधील घटनेने अशा शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांकडून अशा शाळांबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.