“ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; ७१४ किलो अमली पदार्थ नष्ट, विद्यार्थ्यांना संदेशदिला​.

नागपूर शहरात नशेच्या विरोधात निर्णायक पावले उचलत, नागपूर पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई करत ७१४ किलो २३० ग्रॅम अमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई ‘ऑपरेशन थंडर’च्या अंतर्गत करण्यात आली असून, २६ जून या आंतरराष्ट्रीय नशा मुक्ती दिनानिमित्ताने ही प्रक्रिया राबवण्यात आली.नागपूर शहरात नशेच्या विरोधात निर्णायक पावले उचलत, नागपूर पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई करत ७१४ किलो २३० ग्रॅम अमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई ‘ऑपरेशन थंडर’च्या अंतर्गत करण्यात आली असून, २६ जून या आंतरराष्ट्रीय नशा मुक्ती दिनानिमित्ताने ही प्रक्रिया राबवण्यात आली.पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन सुरू झालेल्या ‘ऑपरेशन थंडर’ या मोहिमेअंतर्गत नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल ५४ प्रकरणांतील मादक पदार्थ (MPCB) च्या मान्यतेनुसार नष्ट करण्यात आले.

एकूण नष्ट केलेल्या अमली पदार्थांचे वजन ७१४ किलो २३० ग्रॅम असून, त्याची अंदाजित किंमत सुमारे १.३२ कोटी इतकी आहे. या नष्ट करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये गांजा, मेफेड्रोन, चरस आणि डोडा पावडरसारख्या अत्यंत घातक आणि व्यसनाधीन पदार्थांचा समावेश होता.ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या मानकांनुसार, बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र एन्व्हायरो लिमिटेड या अधिकृत संस्थेमार्फत पार पडली. या महत्त्वपूर्ण कारवाईच्या वेळी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महादेव भारसाकडे, पोलीस निरीक्षक पाटील, MPCB अधिकारी, एन्व्हायरो कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मस्के, अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या टीमची उपस्थिती होती.

या संपूर्ण उपक्रमामध्ये विशेष आकर्षण म्हणजे शहरातील कॉलेज व शाळांमधील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रत्यक्ष दाखवून दिले गेले. नशेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे नुकसान व व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांचे भवितव्य कसे उद्ध्वस्त होते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.नागपूर पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने निश्चितच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल म्हणता येईल.नशेच्या विरोधात समाजाची सशक्त भूमिका उभारण्यासाठी अशी कडक आणि समाजप्रबोधनात्मक कारवाई गरजेची आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.