शुभमन गिलच्या नेतृत्त्वात मोठा कलंक, 1928 नंतर क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं.

इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते, ज्यामुळे हा पराभव अधिक निराशाजनक ठरला आहे.इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 5 विकेटने पराभव झाला. या पराभवामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावावर एक मोठा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. लीड्स कसोटीतील पराभव भारतीय खेळाडू आणि चाहते सहजासहजी विसरणार नाहीत. या पराभवामुळे भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे, जो यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की, ज्या संघात 5 फलंदाजांनी शतके झळकावली, तरीही त्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघासोबत असाच प्रकार घडला. यापूर्वी 1928-29 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एका सामन्यात 4 शतके झळकावली होती, परंतु त्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. लीड्स कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी 5 शतके झळकावली आणि तरीही संघाला पराभव पत्करावा लागला.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर यशस्वी जायसवाल, कर्णधार शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. त्याचबरोबर, दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनीही शतकी खेळी केली. अशा प्रकारे, या सामन्यात भारतीय संघाकडून एकूण 5 शतके लागली आणि शेवटी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ ४७१ धावांवर ऑलआऊट झाला.

इंग्लंडने पहिल्या डावात ओली पोपच्या शतकी खेळीच्या बळावर 465 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला केवळ 6 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर, दुसऱ्या डावात भारतीय संघाने 364 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य यजमान संघाने 82 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन डकेटने 149 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या शानदार खेळीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले. पाच सा्मन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने इंग्लंडने आघाडी घेतली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.