“भाजपच्या एका बेडकाकडे तेवढेच काम”; नितेश राणेंवर टीका करताना नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. तसंच ठाकरे यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनाही आक्रमक शब्दांत लक्ष्य केलं. “सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात असून भाजपच्या एका बेडकाकडे तेवढेच काम दिले आहे. परंतु तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. परंतु तुम्ही शेटजींची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली असा आरोप करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता टीका केली.’भाजपही असाच आहे, ज्या सरदार पटेल यांनी संघावर बंदी आणली होती त्याच पटेलांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा बांधण्याची वेळ यांच्यावर आली. हे यांचे कर्तृत्व आणि आपल्याला शिकवतात हिंदुत्व’, असेही ते म्हणाले. ‘तुम्ही सैन्याचे पाय बांधले नसते तर आपण पाकिस्तान घेतलाच असता. परंतु ट्रम्पचा फोन आल्यावर तुमचा आवाजच गेला. चार अतिरेकी आलेच कसे? अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले?’, असा प्रश्नही त्यांनी केला.”केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. विविध अपघातांमध्ये लोक मरत असताना ते कशाचीच जवाबदारी घेत नाहीत. आज देशाला पंतप्रधानाची गरज असताना ते केवळ भाजपचे आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही.

देशाला संरक्षणमंत्र्याची गरज आहे, गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंह यांची नाही. आम्ही तुमच्याविरोधात इंडिया आघाडी उभी केली तर तुम्ही लगेच आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनबरोबर केली. आम्ही इंडियन मुजाहिद्दीनसारखे आहोत, तर तुम्ही न केलेल्या शौर्याचे कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले,” असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, लष्करातील सोफिया कुरेशी यांनी बाणेदारपणाने भारताची बाजू मांडली. त्याच कुरेशी यांना मंत्री विजय शहा दहशतवाद्यांची बहीण म्हणतो. अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे. याच भाजपकडून आपण देश सुधारण्याची आशा करत आहोत,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.