शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांविरोधात — शाळांनी सतर्क आणि जागरूक राहावे सदरचे राजसाहेब ठाकरे यांचे पत्र आज पहूर येथील आर.ले.ले. माध्यमिक विध्यालय , Dr हेडगेवार प्राथमिक विद्यालय व शेंदुर्णी येथील श्रीकृष्णा माध्यमिक विध्यालय ,आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यामंदिर , गुरुकुल विद्यामंदिर , राजमल लखीचंद ललवाणी प्राथमिक विद्यामंदिर , जि.प.प्रा.विद्यामंदिर गोंदेगांव , सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर शेंदुर्णी ,यांना प्रथमता निवेदन दिले.एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयता पहिलोपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल.हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे.त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी ध्यायचा आहे, आपल्या काथ देणंघेणं त्याच्याशी. पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहूच. पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील.










