14 वर्षीय बालकाची निर्घृण हत्या, नरबळीचा संशय फोल, 36 तासात छडा लागला, डोक्याला मुंग्या आणणारं कारण.

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत या घटनेचा छडा लावला.जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय बालकाची क्रूर हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत या घटनेचा छडा लावून तिघांपैकी दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मुलाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन तिघा जणांनी बालकाला मारहाण करीत चाकूने त्याचा गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. हरदास वास्कले व सुरेश खरते अशी अटक केलेल्यांची नावे असून तिसरा संशयित रिचडिया कटोले फरार आहे.रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील अल्पवयीन बालकाला त्याच्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार त्याचे वडील गजानन महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिली होती.

मंगळवारी रिंगणगाव-खर्चे रोडवरील पडक्या शेतात एका काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आणि महामार्गावर निदर्शने करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.या गुन्ह्यात आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता, तसेच त्यांना कुणीही पाहिले नव्हते. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पोलिसांनी या बालकाच्या हालचालींचा आणि तो कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला याचा कसून तपास सुरू केला. मृतदेह आढळला तेथून 50 फूट अंतरावर राहणाऱ्या मध्य प्रदेशातील खर्गोन परिसरातील काही मजुरांवर पोलिसांना संशय आला.यातील हरदास वास्कले आणि सुरेश खरते हे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्याने पोलिसांचा संशय बळावला. हरदास वास्कले याला फैजपूर-रावेर मार्गावर मोटारसायकलवर जात असताना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.चौकशीअंती हरदास वास्कले याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार शेजारी राहणाऱ्या सुरेश खरते आणि गावातील रिचडिया कटोले यांच्यासोबत फिरत असताना बालकाला सुरेश वास्कलेचा धक्का लागला. यावरून सुरेशने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली होती. बालकाने विरोध केला असता तिघांनी त्याला मारहाण केली आणि रिचडिया कटोले याने त्याच्याकडील चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह झुडपात लपवून ठेवला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरेश खरते याचा मध्य प्रदेशातील धोपा, ता. झिरन्या, जि. खर्गोन येथून डोंगरवस्तीतून पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात तिसरा साथीदार रिचडिया कटोले याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.