अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत गोंधळ.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आज(१४ जून) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आज(१४ जून) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलिसांनी प्रहार संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला. या दरम्यान सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरुन बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले नाही तर त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे पडसाद आज पुण्यात पहायला मिळाले.पुण्यातील मॉडेल स्कूल आयोजित उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर बोलत असताना बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांसाठीच्या भाषणाला सुरुवात करताच बच्चू कडूंचे समर्थक असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचे दिसून आले. या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला.

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावरुन आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.दरम्यान, बच्चू कडू मागील काही दिवसांपासून जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठींबा दर्शवला आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला जर सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर महायुती सरकारचा निषेध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे दिवसेंदिवस बच्चू कडूंची प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे सरकारने वेळीच पाऊलं उचलावीत अन्यथा तीव्र पडसाद उमटतील असे संतप्त कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.