आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळ ५२०० जादा बसेस सोडणार; परिवहनमंत्री सरनाईकांची घोषणा.

राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात पाच हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात पाच हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

या वेळी परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, ‘यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने येणाऱ्या प्रवाशांना एसटीने यंदा थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासातदेखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी तिकीटदरात ५० टक्के सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सर्व सवलती लागू असतील.’आषाढी यात्रा काळात लांबून एसटी बस येत असतात. त्या बसचालकांना व वाहकांची राहण्याची चांगली व्यवस्था करावी. त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे.

बसस्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल-दुरुस्ती करावी. बसच्या तत्काळ दुरुस्तीसाठी जादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही परिवहनमंत्री सरनाईक यांनी दिल्या. यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या एसटीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यात्राकाळात होणारी गर्दी लक्षात घेता एकाच बसस्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

  • Related Posts

    “शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर”

    “शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर” जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळलेल्या दोन कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी शासकीय…

    गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम…

    गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम… जळगाव : शहराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव राबवित आहे. गणेश विसर्जनानंतर ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी “स्वच्छ भारत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..