ठाकरे बंधू सोबत येणार? महायुतीची धाकधूक वाढली; मुकाबला करण्यासाठी रणनीती ठरली, प्लान काय?

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महायुती सावध झाली आहे.मुंबई: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आलेला आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू सोबत येऊ शकतात. तशी चर्चा गेल्या दीड महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर उद्धव यांनी राज यांच्यासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही बंधूंनी मनोमिलनाच्या दृष्टीनं सकारात्मक विधानं केलेली आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वाढली आहे. ही घडामोड पाहता महायुतीनं त्यांना टक्कर देण्यासाठी रणनीती आखली आहे.ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसू शकतो. त्यामुळे महायुती मुंबई महापालिकेत सोबत लढण्याची शक्यता आहे. तशा हालचाली महायुतीच्या गोटात सुरु झालेल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महायुतीमधील तिन्ही पक्ष सोबत आल्यास मराठी, उत्तर भारतीय मतांचं विभाजन होऊ शकतं.

हे मत विभाजन टाळण्यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढू शकते.मुंबईत ठाकरे बंधूंचा एकत्र मुकाबला करायचा आणि अन्य महापालिकांमध्ये स्वबळ आजमावून पाहायचं, या रणनीतीवर महायुतीच्या गोटात काम सुरु आहे. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं, पुणे, नागपूर, नवी मुंबईत भाजपचं वर्चस्व आहे. या शहरांमध्ये दोन्ही ठाकरेंची फारशी ताकद नाही. यामुळे या महापालिकांमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर लढू शकतात.मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास तब्बल ५२.१ टक्के मतदार त्यांच्या बाजूनं कौल देऊ शकतात, असं विकली वाईबचा सर्व्हे सांगतो. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेला २६.२ टक्के मतदार मतदान करु शकतात, अशी आकडेवारी सर्व्हेतून समोर आलेली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..