मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. एसी ट्रेन भाडे न वाढवता देण्याचा सरकारचा विचार आहे. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचा भरआहे.मुंबई: मुंबईतील शहराजवळी मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी लोकल ट्रेनचा अपघात झाला. दोन लोकल गाड्यांच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने चार जणांना आपले प्राण गमावावे लागले. या दुर्घटनेनंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.
“एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा, असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे. मेट्रोचे जाळे नसल्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे. लोकांना हवा खेळती राहावी यासाठी सरकार उपाययोजना करेल. लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल, हे सरकारला कळतं. तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “रेल्वेमंत्र्यांची असंवेदनशीलता, अशा आशयाची बातमी पाहिली. पण 9 जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत अडीच तास बोलत होते.”शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी वेळेचं बंधन दिलं आहे.









