मोठ्या कष्टाने पोलीस भरती, घर घेतलं, मुलाच्या वाढदिवसाचं नियोजन अर्धवट राहिलं, विकीच्या एक्झिटने हळहळ.

मुंबई लोकल अपघातामध्ये १३ जण जखमी झाले होते. तर यामधील चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये जीआरपी कर्मचारी विकी मुख्यदल याचाही समावेश आहे. ड्युटीदरम्यान त्याच्यावर काळाने घाला घातला. विकीच्या मुलाचा वाढदिवस पुढच्या आठवड्यात होता. मात्र त्याआधीच होत्याचं नव्हतं घडलं.मुंबईमधील मुंब्रा आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान मोठा अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. दोन लोकल ट्रेनमधून पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत १३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर मृतांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केला गेलेला नाही. पण या मृतांमध्ये एक जीआरपी कर्मचाऱ्यालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. विकी बाबासाहेब मुख्यदल असं मृत जीआरपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या अपघातमधील गंभीर जखमींवर ज्युपिटर आणि इतरांवर कळवा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मितभाषी, मित्रांमध्ये पटकन रुळणारा, कर्तव्य बजावताना जिवाची बाजी लावणारा विकी मुख्यदल (वय ३४) या पोलिस कर्मचाऱ्याचा मुंब्रा दुर्घटनेत मृत्यू झाला. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.

विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला चटका लावून गेली.कष्टाच्या जीवावर जालना येथून पोलिस भरतीची परीक्षा उत्तीर्ण होऊन चार वर्षांपूर्वी विकी कल्याण रेल्वे पोलिसांत भरती झाला. नोकरीनंतर लगेचच लग्नाच्या बंधनात अडकला, गृहकर्ज काढून लोकग्राम परिसरातील सिंधू इमारतीत घरही घेतले. पत्नी दीपा आणि तीन वर्षांचा प्रणय अशा सुखी कुटुंबात राहणारा विकी कामात प्रामाणिक होता. अलीकडेच त्याची ठाणे रेल्वे पोलिस दलात बदली झाली होती.सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या विकीने पुढच्या आठवड्यात प्रणयच्या तिसऱ्या वाढदिवसाची जोमात तयारी सुरू केली होती. त्याचा स्वतःचा पाच जूनला वाढदिवस होता. मात्र, सोमवारी काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणयला वाढदिवसाचा केक भरविण्याच्या आधीच त्याला पोरका करून विकी निघून गेल्याचे सांगताना शेजाऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

 कल्याण स्थानकात रेल्वेचोराचा पाठलाग करून त्याला ट्रॅकमधून पकडून आणण्यासाठी त्याने जीवाची बाजी लावल्याची आठवण सांगताना त्याच्या सहकाऱ्यांचा कंठ दाटून आला. इमारतीतही तो सर्वांचा आवडता होता.दरम्यान, घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी आठवड्याचा पहिला वार धक्कादायक ठरला. मुंबईहून कर्जतकडे आणि कसारा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन जलद लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा मुंब्रा स्थानकानजीकच्या तीव्र वळणावर परस्परांशी घासल्या गेल्या आणि दोन्ही गाड्यांतील १३ प्रवासी रुळांवर पडले. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..