रायगडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 5 जून रोजी सायंकाळी 4:00 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10:00 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई यासह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून लाखो शिवभक्त येणार आहेत. रायगडावर जाण्यासाठी माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला हे तीन मार्ग आहेत.











