मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी एलिमिनेटर मॅचमध्ये गुजरात टायटन्सला 20 धावांनी हरवले. आता क्वालिफायर-2 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्सशी होईल. जर मुंबई इंडियन्स जिंकली, तर 3 जूनला त्यांचा अतिंम सामना सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) सोबत होईल. IPL 2025 चा अंतिम सामनादेखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.पण त्याआधी RCB चा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सला एक भीती वाटत आहे. ही भीती आहे जसप्रीत बुमराहची. बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी या सीजनमध्ये जोरदार बॉलिंग केली आहे. त्याने टीमला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता क्वालिफायर आणि फायनलमध्ये तो काय करतो, हे बघण्यासारखे आहे.
जसप्रीत बुमराह सध्या जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे, यात काही शंका नाही. एबी डिव्हिलियर्स, ज्यास मिस्टर 360 डिग्री म्हणतो, त्यामुळेच त्याला IPL 2025 च्या फायनलमध्ये RCB विरुद्ध मुंबई इंडियन्स येऊ शकते, याची भीती वाटते. ते जसप्रीत बुमराहबद्दल म्हणाले, “गेम तोपर्यंत संपत नाही, जोपर्यंत बुमराहची गोलंदाजी संपत नाही. गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटर मॅचमध्ये त्याने दाखवून दिले की तो सर्वोत्तम का आहे.”जसप्रीत बुमराह मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीम आणि मुंबई इंडियन्ससाठी ‘जिंकण्याची गॅरंटी’ बनला आहे. त्याच्यामध्ये अशी क्षमता आहे की तो कठीण परिस्थितीत सुद्धा मॅच जिंकून देऊ शकतो.
त्याने हे अनेक वेळा करून दाखवले आहे. त्यामुळेच एबी डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू सुद्धा फायनलमध्ये मुंबई इंडियन्स आणि RCB चा सामना होऊ नये, असे त्यांना वाटते. कारण बुमराह कधी काय करेल, याचा नेम नाही.आता बघूया, क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्स काय करते. अनेक माजी खेळाडूंच्या मते मुंबई इंडियन्सचे पारडे जड आहे कारण ते ग्रुप स्टेजमध्ये वेगळे खेळतात आणि एलिमिनेटर, क्वालिफायर, अंतिम सामन्यात अतिशय वेगळे असतात.










