नाशिकला तडाखा; विभागात १७५३३ हेक्टरवरील पिकांचे मातेरे, ४१ हजार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.

विभागातील सुमारे १७ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मातेरे झाल्याची बाब नाशिक विभाग कृषी सहसंचालक यांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ५ ते २८ मे या २४ दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी घातलेल्या थैमानामुळे ४१ हजार १२ शेतकऱ्यांना फटका बसला. विभागातील सुमारे १७ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मातेरे झाल्याची बाब नाशिक विभाग कृषी सहसंचालक यांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.सर्वाधिक २३ हजार १११ शेतकऱ्यांच्या ७ हजार ३३७ हेक्टरवरील विविध शेतपिकांचे नुकसान केवळ नाशिक जिल्ह्यात झाले. जळगाव जिल्ह्यातही १२ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिके या अवकाळी पावसाने हिरावून नेली. आता पंचनामे होऊन शासकीय नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

राज्यासह नाशिक विभागात मे महिन्यातच अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. हे अवकाळीचे संकट थेट ५ ते २८ मे पर्यंत घोंगावत होते. या अस्मानी संकटाने नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, डाळींब, द्राक्षे, पपई, मका, बाजरी, आंबा अशा विविध पिकाचे आतोनात नुकसान झाले. अस्मानी संकटामुळे विभागातील तब्बल ४१ हजार १२ शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला शेतपिकांचा घास हिरावला होता. या संकटामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले.विशेष म्हणजे पुढील वर्षांच्या खरीप हंगामाच्या ऐन तोंडावरच अवकाळीच्या संकटाने विभागात थैमान घातल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली आहे. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात ४९५८ शेतकऱ्याचे ३ हजार ४१६ हेक्टरवरील, नंदुरबार जिल्ह्यातील २६८ शेतकऱ्याचे १ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले असून, अद्याप या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही.नाशिक विभागात सर्वात जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या पेठ तालुक्यात असून, दुसऱ्या क्रमांकावर सुरगाणा तालुक्याने झेप घेतली आहे, तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पेठ तालुक्यात ४८१९ शेतकऱ्याच्या १२५७ हेक्टरवरील, सुरगाणा तालुक्यातील ४५१ शेतकऱ्यांच्या ५९४ क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली. मुक्ताईनगर जिल्ह्यातही ३ हजार ३९५ शेतकऱ्यांचे अस्मानी संकटामुळे २३१७ शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके हिताची नव्हती झाली. विभागात नाशिक, इगतपुरी, निफाड, सिन्नर, साक्री या पाच तालुक्यांत १० दिवसाहून जास्त अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने या तालुक्यांत शेतपिकांचे नुकसान जास्त झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.