नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ.

नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 21 मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Company) 21 मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या (Fire) पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या वतीने कंपनीला क्लोजर नोटीस पाठवून उत्पादनाचे काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत कंपनीकडून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना राबवून संबंधित प्रमाणपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत उत्पादन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. पॉलिफिल्म बनवणाऱ्या या कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरीही प्लांटमधून अजूनही धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. आगीत कंपनीच्या प्रोडक्शन विभागातील अनेक यंत्रसामग्री, युनिट्स आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे.

या कंपनीत सुमारे 5 हजार कामगार कार्यरत होते. त्यापैकी अनेक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. सध्याच्या स्थितीत काम बंद असल्याने बहुतांश कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांना पर्यायी रोजगाराच्या शोधात इतरत्र वळावे लागणार आहे. 3200 कोटींची गुंतवणूक, 260 एकरात कंपनीचा विस्तार शासकीय कागदपत्रांनुसार, या कंपनीत सुमारे 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, कंपनीचा विस्तार सुमारे 260 एकर क्षेत्रावर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली असताना सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. अहवाल आणि प्रमाणपत्रांची सक्ती कंपनीला उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. यात स्थैर्यता प्रमाणपत्र, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल, आग व सुरक्षा उपाययोजनांचा संपूर्ण अहवाल कमकुवत झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीची प्रक्रिया आणि त्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.तोपर्यंत उत्पादन सुरू करण्यास परवानगी नाही प्राथमिक तपासणीत असे आढळले आहे की, आग लागली त्यावेळी कच्चा माल अव्यवस्थितरित्या साठवण्यात आला होता, तसेच आग विझविण्यासाठी कोणतीही तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना उपलब्ध नव्हती. जोपर्यंत वरील सर्व प्रमाणपत्रे आणि अहवाल सादर केले जात नाहीत, तोपर्यंत कंपनीचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने घेतली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.