20 कोटींचं कर्ज, जीवे मारण्याच्या धमक्या; कुटुंबानं जीव दिला, नातेवाईकानं काय काय सांगितलं?

पंचकुलात एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली आहे. एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचे मृतदेह एका कारमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे.चंदिगढ: पंचकुलामध्ये प्रवीण मित्तल यांनी त्यांच्या कुटुंबातील ७ सदस्यांसह आत्महत्या केली. प्रवीण टॅक्सी चालक म्हणून काम करायचे. प्रवीणवर १५ ते २० कोटी रुपयांचं कर्ज होतं. मित्तल कुटुंब मूळचं हिसारच्या बरवालाचं होतं. गेल्या १२ वर्षांपासून मित्तल कुटुंब पंचकुलात वास्तव्यास होतं. काही वर्षांपूर्वी प्रवीण यांची हिमाचल प्रदेशातील स्क्रॅप फॅक्टरी बँकेनं जप्त केली. कर्जाची परतफेड न केल्यानं बँकेनं ही कारवाई केली. आर्थिरक अडचणीत असलेले प्रवीण अचानक पंचकुला सोडून उत्तराखंडच्या देहरादूनला गेले. ते ५ वर्ष अनेकांच्या संपर्कात नव्हते.कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करणाऱ्या प्रवीण यांच्या डोक्यावर २० कोटी रुपयांचं कर्ज होतं. मित्तल यांचं कुटुंब मोहालीच्या खरडनंतर पंचकुलाच्या सकेतडी गावाजवळ वास्तव्यास होतं. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणीत आलेल्या प्रवीण यांची मालमत्ता बँकेनं जप्त केली. आधी त्यांचे दोन फ्लॅट ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर कारखाना आणि वाहनांवर टाच आणली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणनं आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. माझे अंत्यसंस्कार चुलत भाऊ संदीप अग्रवाल यांनी करावेत, अशी इच्छा प्रवीण यांनी चिठ्ठीत लिहिली आहे. संदीप आणि प्रवीण यांच्यात ५ दिवसांपूर्वीच संवाद झाला होता.प्रवीण आणि त्यांचं कुटुंब २०२० ते २०२३ या कालावधीत देहरादूनमध्ये वास्तव्यास होतं. प्रवीणनं त्याच्या कुटुंबासह हुंडाई ऑरा या कारमध्ये आत्महत्या केली. या कारचा क्रमांक UK ०७ DY ३०५५ असा आहे. ही कार गंभीर सिंह नेगी यांच्या नावावर आहे. नेगी यांनी प्रवीण यांना त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे कार घेऊन गेली होती. याची माहिती गंभीर नेगी यांनी पोलिसांना दिली आहे.प्रवीण यांचे मामेभाऊ संदीप अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्तल कुटुंब मूळचं हिसारच्या बरवालाचं रहिवासी होतं. जवळपास १२ वर्षांपूर्वी मित्तल कुटुंब पंचकुलात स्थायिक झालं. त्यांचा स्क्रॅपचा कारखाना हिमाचल प्रदेशात होता. पण बँकेनं त्यावर जप्ती आणली. त्यावर बरंच कर्ज होतं. यानंतर कुटुंब पंचकुलामधून एकाएकी गायब धालं. त्यानंतर ते देहरादूनला राहायला गेले. ५ वर्षे त्यांनी कोणाशीही संपर्क केला नाही.देहारादूननंतर मित्तल कुटुब मोहालीच्या खरडमध्ये राहू लागलं. ते देहरादूनला राहायला गेले, तेव्हा त्यांच्यावर २० कोटी रुपयांचं कर्ज होतं. कर्जाची परतफेड करता येत नसल्यानं त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. प्रवीण टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कर्जामुळे बँकेनं त्यांचे दोन फ्लॅट, एक कारखाना आणि वाहनं आधीच जप्त केली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.