पुण्यात झालेल्या पावसाने बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे,राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस होत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुण्यात पावसाची झड कायम आहे. दरम्यान, आता पावसाने राज्यातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील दौंड तालुतक्यात झालेल्या मुसळधार पावसाने दुकानात बसलेल्या 75 वर्षांच्या महिलेच्या अंगावर जून्या बांधकामाची भिंत कोसळून जागीच मृत्यू झालाय. रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाने पुण्यात राज्यातील पहिला बळी दौंड शहरात दुकानात बसलेल्या ताराबाई विश्वचंद्र आहिर या 75 वर्षीय महिलेच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. राज्यात पावसाची सुरुवात होताच दौंड शहरात पहिलाच बळी गेला असून, जुन्या बांधकामाची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.










