रायगडला पावसाने झोडपले; एका तरुणाचा मृत्यू, अनेक रस्ते खचले, कोणत्या मार्गांवरील वाहतूक बंद?

 रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला, तर उरणमध्ये दोघे जखमी झाले आहेत. कोंझर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.अमुलकुमार जैन, अलिबाग: रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आगे. परिणामी घरांचे नुकसान झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत तालुक्यात वीज पडून एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर उरण तालुक्यात दोन जण जखमी झाले आहेत. रायगड किल्ल्याजवळील कोंझर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळी ९ वाजेपर्यंत अंधार पसरला होता. ढगांच्या गडगडाटाने आणि मुसळधार पावसाने लोकांना भयभीत केले. रायगड किल्ल्याच्या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. “रेड अलर्ट खरा ठरला,” असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुसळधार पावसामुळे रायगड महामार्गावरील कोंझर घाटातील रस्ता खचला आहे. या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. कारण, नव्याने बांधलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग पावसामुळे खचला आहे. पहाटेपासून रायगड जिल्ह्यात खोपोली, म्हसळा, महाड, माथेरान, अलिबाग, रोहा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. म्हसळा-खामगाव मार्गावर एक मोठे झाड पडल्याने वाहतूक थांबली होती. रोहा-चानेरा मार्गावरही झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात २६ मे २०२४ रोजी रोशन कालेकर (वय ३०) नावाचा युवक शेतात काम करत असताना वीज पडून जागीच मरण पावला. उरण तालुक्यातील कळंबसुरे येथे दोन जण जखमी झाले.

अलिबाग-रोहा राज्यमार्गावरील महाजने-बेलोशी पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नदीतून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, नदीला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. अत्यावश्यक सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. पोलादपूर तालुक्यात रमेश राजाराम शेलार यांच्या घराची संरक्षण भिंत पडून घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. म्हसळा तालुक्यातील वरवठणेकोंड येथे सचिन वसंत जंगम यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली. मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे रमाकांत रामचंद्र घागरी यांच्या घरावरील कौले फुटली. काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील डाकेली येथे वनिता हरिश्चंद्र घडशी आणि सुभाष बाळया घडशी यांच्या घरांची कौले फुटून नुकसान झाले. आगरदांडा येथील बौद्ध वाडीतील स्मशानभूमीची भिंत पडली. मुरुड नगरपालिकेच्या हद्दीतील दत्त वाडी येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगराखाली राहणाऱ्या २० कुटुंबांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लक्ष्मीखार भागात काही घरांमध्ये पाणी शिरले, तर शीघ्र येथे रस्त्यावर पाणी आले होते. मोरे येथे मातीचा साकव वाहून गेला.उरण तालुक्यातील बेलिवाडी आदिवासी व कळंबसुरे येथे जवळपास १३५ घरांचे नुकसान झाले आहे. खालापूर येथील चिंचवली शेकीन येथील ITI कॉलेजमध्ये पाणी शिरले आहे. केळवली स्टेशनवर पाणी साचले असले तरी लोकल सेवा सुरू आहे. श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. वाळवटी गावात पाणी साचले असून रस्त्यावरील पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाळवटी भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पावसाळ्यामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी: घरातून बाहेर पडताना रेनकोट किंवा छत्रीचा वापर करा. विद्युत खांबांपासून दूर राहा. नदी, नाले आणि तलावांजवळ जाऊ नका. आपल्या घराजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.  प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.