लेक घरातून पळाली; आई-वडील, लहान मुलगी तलावावर गेले… हसत्या-खेळत्या कुटुंबाने नको तेच केलं.

मोठी मुलगी घरातून पळून गेली होती. त्यामुळे हे कुटुंब खूप निराश झालं होतं. त्यातून त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंब संपलं पण तरी ती मुलगी कुटुंबाच्या अंत्यसंस्कारालाही आली नाही.एकाच कुटुंबातील तिघांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील एच.डी. कोटे तालुक्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. बुदनूर गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. मोठी मुलगी घरातून पळून गेल्याने आपली समाजात बदनामी होईल असं कुटुंबाला वाटत होतं. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.महादेव स्वामी (वय 55), मंजुला (वय 45) आणि त्यांची लहान मुलगी हर्षिता अशी मृतांची नावं असल्याची माहिती आहे. या तिघांनी बुदनूरच्या तलावात उडी घेत आपला जीव दिला. त्यांची मोठी मुलगी घरातून पळून गेल्याने हे कुटुंब तणावात होते, असं सांगितलं जात आहे.शनिवारी (24 मे) सकाळी हे तिघेजण दुचाकीवरून तलावाजवळ आले. त्यांनी दुचाकी तिथेच उभी केली. चपला काढल्या आणि एक पत्र लिहिलं. त्यानंतर त्यांनी तलावात उडी घेतली.

काही स्थानिक लोकांनी रस्त्यात बेवारस दुचाकी बघितली. ती कोणाची आहे हे त्यांना कळेना. त्यांनी लगेच एच. डी. कोटे पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह एच. डी. कोटे शवगृहात पाठवले.शवविच्छेदनानंतर गावात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. घरातून पळून गेलेली मोठी मुलगी अंत्यसंस्कारालाही आली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, बुदनूर गावात राहणारे महादेव स्वामी यांची मोठी मुलगी एका मुलावर प्रेम करत होती. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. पण, घरच्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे ती प्रियकरासोबत पळून गेली होती.मृत्यू आधी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारणंही सांगितलं आहे. “आमच्या मृत्यूला आम्हीच जबाबदार आहोत, आमच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलीला कोणतीही संपत्ती किंवा पैसा देऊ नये. तिने आम्हाला धोका दिला आहे. आमच्यासारखी परिस्थिती जगात कोणावरही येऊ नये. आम्ही हे पाऊल बदनामीच्या भीतीने उचलत आहोत”, असं त्यांनी लिहिलं आहे. सध्या एच.डी. कोटे पोलिसांनी मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव स्वामींच्या मोठ्या मुलीनं घर सोडल्यामुळे ते खूप दुःखी होते. समाजात आपली बदनामी होईल, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि लहान मुलीसोबत जीव देण्याचा करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक सांगितलं की, महादेव स्वामींचं कुटुंब हे आनंदी कुटुंब होतं. पण, त्यांची मुलगी पळून गेल्यापासून ते खूप निराश झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.