चंद्रपूर हादरलं! वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, वाचविण्यासाठी धावलेला पुतण्याही जखमी, १३ दिवसांत ९ घटना.

या गुराख्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या पुतण्यावरही वाघाने हल्ला केल्याने तो जखमी झाला. मागील १३ दिवसांत व्याघ्रहल्ल्याच्या नऊ नऊ घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहेमूलपासून सुमारे दहा किमी अंतरावरील करवण शेतशिवारात गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करून गुराख्याला ठार मारले. या गुराख्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या पुतण्यावरही वाघाने हल्ला केल्याने तो जखमी झाला. मागील १३ दिवसांत व्याघ्रहल्ल्याच्या नऊ घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल नियतक्षेत्रात बंडू परशुराम उराडे (५५) हे घरची गुरे चराईसाठी करवण येथील शेतशिवारात गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यांना वाचविण्याकरता त्यांचा पुतण्या किशोर मधुकर उराडे (३५) हा गेला असता वाघाने त्याच्यावरही हल्ला केल्याने तो जखमी झाला. हे पाहताच इतर गुराखी धावून आले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. तोवर बंडू यांना वाघाने शंभर फुटापर्यंत फरफटत नेले होते. व्याघ्रहल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. वाघाला जेरबंद केल्याशिवाय मृतदेहाला हात लावणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेअंती शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. वनविभागाच्यावतीने मृताच्या कुटुंबास ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. परिसरात गस्त वाढवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलनादरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. जंगल परिसरालगत भागातही काळजी घेणे गरजेचे आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झाल्याच्या घटनेतील संख्या बावीसवर पोहचली आहे. यातील सर्व हल्ले वाघाने केले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झाल्याच्या एकोणतीस घटना घडल्या होत्या. यातील २७ हल्ले वाघाने तर बिबट्या आणि रानडुकराच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता. २०२३ या वर्षी वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या २५ होती. यातील २१ हल्ले वाघाने, तीन बिबट्याने तर एक रानडुकराने केला होता. २०२२ या वर्षभरात जिल्ह्यातील वन्यजीव हल्ल्यातील ठार झालेल्यांची संख्या ५१ होती. यातील ४४ हल्ले वाघाने तर सात बिबट्याने केले होते.शौचास जात असलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने झडप घेत त्याच्या हाताला चावा घेतला. आरडाओरड केल्यामुळे बिबट घटनास्थळावरून पळून गेला. सदर घटना नागझिरा वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या पिटेझरी येथे घडली. गिरधारी बळीराम उईके (वय ३५) रा. पिटेझरी असे जखमीचे नाव आहे. गिरधारी हे पहाटे ४.१५ वाजतादरम्यान घरामागील शौचालयात जात असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने हाताला चावा घेतल्यामुळे गिरधारी जखमी झाला. त्याने आरडाओरड करताच कुटुंबीय व शेजारी धावून आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट तेथून पळून गेला. गिरधारी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. वन्यजीव विभागाने पंचनामा करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ‘सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर येत असतात. त्यामुळे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, एकट्याने जंगल परिसरात जाऊ नये’, असे आवाहन साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.